पहिल्यांदाच आकाश ठोसरने दिली प्रे’माची क’बुली, ‘रिंकू’सोबत रिले’शनशीपमध्ये असल्याच्या च’र्चेवर सोडले मौन..

सैराट सिनेमाचे नाव जरी ऐकले तरीही, आर्ची आणि परशा डोळ्यासमोर येतात. किशोरवयातील या प्रेमकथेने केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशातील जनतेला वे’डं लावलं होत. आता पुन्हा एकदा नागराज मंजुळे प्रेमाची तीच जादू मोठ्या पडद्यावर घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत.
काहीच दिवसांपूर्वी त्यांनी ‘घर, बं दूक, बिरयानी’ चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट नेमका काय असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता बघितली जात होती. माघील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. प्रेक्षकांनी देखील या टीझरला भरगोस प्रतिसाद दिला.
आणि नुकतंच आता चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. हटके नाव आणि वेगळ्या ढंगात सादर केल्याने या ट्रेलरला लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. यावेळी आकाश ठोसरचा लुक आणि नवख्या अभिनेत्रीसोबतची त्याची केमि स्ट्री हा सगळीकडेच च र्चेचा विषय ठरत आहे.
सैराटमध्ये आकाश आणि रिंकू दोघाच्या केमि स्ट्रीने संपूर्ण देशाला आपल्या प्रेमात पाडलं. खरं तेव्हापासूनच रिंकू आणि आकाश दोघांच्या नात्याची अधून- मधून च र्चा सुरूच असते. दोघांनी याबद्दल कधीच उघडपणे काही बोललं नव्हतं. मात्र आता ‘घर, बंदूक, बिर्यानी’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आकाश, रिंकू सोबतच्या आपल्या नात्याबद्दल स्पष्टच बोलला आहे.
रिंकू आणि त्याच नातं नेमकं काय आहे याबद्दल त्याने स्वतः च सांगितलं आहे. अनेकवेळा एकमेकांना भेटल्यावर आकाश आणि रिंकू आपले फो’टोज देखील सो’शल मी’डियावर शे’अर करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेअर केलेल्या फो’टोवर तर खूपच भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.
काहींनी तर, ‘या दोघांनी आता लग्न करायला हरकत नाही,’ असं कमेंट केली. याबद्दल बोलताना आकाश म्हणाला, ‘अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर मला आणि रिंकूला याची फार गंमत वाटते. बऱ्याच वेळा फक्त मजेशीर प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही दोघे फोटो पोस्ट करून त्याची फक्त मजा घेत असतो.
पण हे लोकांचे प्रेम आहे, या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, हे यश गाठू शकलो आहोत.’ त्यातच तो पुढे म्हणाला की, ‘आम्ही दोघेही एकमेकांना डे’ट करत आहोत या सगळ्या अफवा आहेत. आम्ही खूप चांगले मित्र आहोत यापलीकडे काहीच नाही.’
मग रिंकू नाही तर लग्नासाठी आकाशला कशी मुलगी हवी? या प्रश्नावर त्याने सांगितलं की, ‘जी मुलगी बिर्याणी खूप छान बनवेल तिच्याही मला लग्न करायला आवडेल. कारण जिला बिर्याणी बनवता येते तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो. मला स्वतःला स्वयंपाक खूप छान बनवता येतो.
मी पहिलवान बनण्यासाठी जिथे जात होतो तिथे प्रत्येकालाच स्वतःचे जेवण स्वतःला च बनवायला लागायचे. त्यामुळे पोळी, भाजी, बिरयाणी असं मी आता सगळा स्वयंपाक खूप छान बनवू शकतो.’ तेव्हा आता भविष्यात ज्या मुलीसोबत आकाश लग्न करेल तिला उत्तम बिर्याणी बनवता येत असेल हे मात्र नक्की.

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news