अध्यात्मिक

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे असे स्वामी समर्थ का म्हणतात जाणून घ्या..

श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. आपणा सर्वांचे आराध्यदैवत आपण ज्यांची पूजा करतो जे आपल्याला भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज! पण याचा कधी विचार केलाय का की स्वामीजी अस बोलण्याचा अर्थ काय असेल ? स्वामींनी सांगितलं आहे की तू सत्कर्म करत रहा मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे.

घरातील काही समस्या किंवा जीवनात जर संकटांची रीघ लागली की आपल्याला देवाची आठवण येते. तेव्हा आपण देवाचा धावा करतो. त्यामुळे तात्पुरते क होईना आपल्याला सुख मिळते, थोड्या अडचणी दूर होतात पण चमत्कारिक हे आहे जर आपण नेहमीच वेळ काढून देवाचे स्वामींचे नामस्मरण, मंत्र जप केला तर नेहमीच अडचणींना तोंड द्यायची क्षमता मिळते.

स्वामी समर्थ अक्कलकोटचे एक अवतारी पुरुष होऊन गेले , तसेच स्वामींना दिगंबर दत्ताचा अवतार देखील मानतात. पद्मासनात बसलेली एक प्रसन्न व्यक्ती, हाती एक मणी, चेहऱ्यावर युगायुगांच्या खुणा, असीम तेज असे ते स्वामींचे रूप पाहून भक्त प्रसन्न राहतात. स्वामींची अनेक रुपं आपल्याला पाहायला मिळतात.

माऊलीच्या रुपात देखील स्वामी शांत व आपल्याला आधार देणारे वाटतात. परंतु त्यांचे रूप ने मूळ स्वरूपात आहे ते म्हणजे पद्मासनात चैतन्यमूर्ती व शरीरावर तेजस्वी वलये, साधनेचे अमोघ तेज पाहायला मिळते. स्वामींच्या प्रतिमेसोबत एक वाक्य कायम असते जे आपले भय, चिंता दूर करते ते म्हणजे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे”.

संकटांचा काळ हा आपली कठीण परीक्षा घेत असतो त्यावेळी भिऊ नकोस पुढे चाल अस म्हणणारं कोणीतरी लागत , आपल्याला त्यावेळी आधाराची खूप गरज असते. स्वामीजी भक्तांना सांगतात की तू थांबू नकोस पुढे चालत रहा, प्रयत्न सोडू नकोस, निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठिशी आहे, तू पडलास तर तुला हात देईन, तू प्रयत्न करशील तर यश देईन पण जर तुला काहीच न करता फळ हवे असेल तर तसे होणार नाही.

तसेच स्वामी समर्थ हे खरंच भक्तांना आधार देतात, त्यांना परिस्थितीवर मात करण्यासाठी बळ देतात, त्यांना समर्थ करतात म्हणून ते स्वामी समर्थ आहेत. निराश व्यक्तीला जे मायेचे शब्द हवे असतात तेच स्वामी देतात व धीर देऊन संकटावर त्यामुळे आपण मात करू शकतो. अनेकजण स्वामींच्या लीला गातात, त्यांचे चमत्कार सांगतात, त्यांचे आशीर्वाद असतील तर अशक्य गोष्टी शक्य व साध्य होतील असे वरदान स्वामींनी दिले आहे.

त्यांच्या भक्तांना भक्तीवर प्रसन्न होऊन संकटातून महाराज तारून नेतात. गरीबापासून श्रीमंती पर्यंत, लहानापासून मोठ्या पर्यंत व भित्र्या माणसापासून ते रण गाजवनाऱ्यापर्यंत जे प्रामाणिक व श्रद्धेने पूजा, नामस्मरण करतात त्याच्या पाठीशी स्वामी उभे राहतात. अक्कलकोट पासून सर्वत्र स्वामींची महती पसरली आहे.

स्वामी आपल्याला मदत करतात पण आधी आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवे, विदयार्थ्यांना अभ्यासात साथ हवी असते, सीमेवर जवानांना आधार देणारे हात हवे असतात, शेतात शेतकऱ्यांना पिकांना बळ देणारे आशीर्वाद हवे असतात अशा वेळी स्वामी आपल्याला सांगतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून नेहमी स्वामींचे नामस्मरण करा, योग्य गोष्टींचे आचरण करा. स्वामी तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button