अध्यात्मिक

दुःख, संकटे, ताणतणाव दूर करण्यासाठी करा ही सेवा ; चमत्कार पहा!

मित्रांनो, प्रत्येकालाच जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकटे, अडचणी या येतच असतात. प्रत्येक माणूस हा ताणतणावांमधून जातच असतो. मित्रांनो जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल, सेवेकरी असाल तर मित्रांनो तुमच्या मनी असा दृढनिश्चय हवा की, कोणतेही संकटे, कोणतीही बाधा माझ्या जीवनात येणार नाही. तसेच कोणत्याही संकटांचा सामना जरी करण्याची वेळ आली तर त्या संकटांचा सामना आपण अगदी ठामपणे करू शकेन.

मित्रांनो मी आज तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी सेवा केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दारिद्र्य, दुःख, संकटे निघून जाणार आहेत. ही एक प्रभावी अशी सेवा आहे. जी केल्याने तुम्हाला कोणतीच अडचण तुमच्या आयुष्यात येणार नाही.

मित्रांनो, ही सेवा करीत असताना आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी अगदी विश्वास असणे गरजेचे आहे. अगदी मनोभावे व श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे. कोणतीही सेवा मनोभावे व श्रद्धेने केली तर त्याचे फळ आपणाला नक्की मिळते. चला तर मग जाणून घेऊयात ही सेवा नेमकी कोणती आहे ती. तर मित्रांनो तुम्हाला औदुंबराचे झाड हे माहीतच असेल. औदुंबरला आपण कल्पवृक्ष देखील म्हणतो. औदुंबराच्या बुंध्याशी साक्षात दत्त महाराज तसेच स्वामी समर्थांचा वास असतो. जो व्यक्ती औदुंबराची सेवा करतो त्याला आपल्या जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही. त्याच्यामध्ये सकारात्मक विचार यायला लागतात.

एखाद्या दांपत्याला संतान नसेल तर अशा जोडप्याने औदुंबराची प्रदक्षिणा केल्यास त्यांना संतानप्राप्ती होते. तसेच मित्रांनो तुम्ही औदुंबराची जर सेवा केली तर त्यामुळे कोणत्याच आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. तुमचे आरोग्य चांगले राहील. तर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रत्येक कामात यश मिळत नाही किंवा त्या कामात तुमचे लक्ष लागत नाही.

घरामध्ये वाद विवाद, संकटे असतील तसेच दारिद्र्य, दुःख हे तुमचा पाठलाग करत असेल, उद्योग धंदा असेल तर उद्योग धंदा व्यवस्थित चालत नाही किंवा तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नाही. अशा बऱ्याच समस्यांवर हा उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे. ज्यामुळे तुमच्या या सर्व अडचणी दूर होणार आहेत. तर मित्रांनो मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ही सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर अर्पण करायची आहे.

जर तुमच्या घराजवळ दत्त महाराजांचे मंदिर नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर अर्पण करू शकता आणि तुमची जी काही समस्या आहे ती समस्या तुम्ही सांगायची आहे. म्हणजे तुम्हाला हात जोडून संकल्प करायचा आहे. मित्रांनो ही सेवा तुम्हाला गुरुवारपासून चालू ठेवायची आहे. संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला दररोज औदुंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा मारायच्या आहेत.

तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालत असता त्यावेळेस तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो प्रत्येक प्रदक्षिणा मारीत असताना तुम्हाला औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे म्हणजेच एक प्रदक्षिणा झाल्यानंतर औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आणि नंतर दुसरी प्रदक्षिणा चालू करायची.

तर मित्रांनो अशी ही प्रभावी सेवा जर तुम्ही केली तर मित्रांनो तुमच्या जीवनात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. म्हणजेच अशक्य गोष्टी शक्य होतील. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सकारात्मकता तुमच्या आयुष्यात भरभरून जाईल. आपल्या आयुष्यात सकारात्मक विचार जर आले तर आपल्याला यशाची प्राप्ती होईल. तर अशी ही सेवा केल्याने तुमच्या सर्व अडचणी, संकटे, दुःख दारिद्र्य सर्व काही दूर होऊन तुमच्या इच्छा पूर्ण होतील

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button