उपाय

घराच्या मुख्य प्रवेशद्वा रावर या एका झाडाचे मूळ लावा, तुमचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो काही झाडे ही खूपच शक्तिशाली व खास दैवी शक्ती असाणारी असतात, ज्यांच्या बाजुला अदृश्य शक्ती विराजमान असतात, जी लगेचच आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण करतात. आज आपण अशाच काही झाडांविषयी माहिती घेणार आहोत. ज्या झाडांच्या आजूबाजूला अदृश्य शक्ती विराजमान असते व संपूर्ण प्रकारच्या मनोकामना पूर्ण करतात. तुमच्या आयुष्यात खुपच कष्ट असतील तर हे झाड तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. तस तर प्रत्येक झाडाचे आपली खासियत असते व कोणती ना कोणती अदृश्य शक्ती त्यांच्यामध्ये असते.

परंतु त्यातील काही झाड ही खूपच खास आहेत. कोणत्याही प्रकारची पोजिटिव्ह, निगेटिव्ह शक्ती ही झाडांमध्ये अधिक असते आणि ती त्याच्या मुळाशी असते. असच एक झाड म्हणजे वडाचे झाड, महाकालीचे जे गण असतात ते या झाडावर असतात. जर हे झाड 10 वर्ष जुने असेल तर याचे मूळ भगवान गणेश यांचे रूप धारण करते. म्हणजेच भगवान श्री गणेश यांच्या मुळामध्ये विराजमान असतात.

भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. तुमच्या जीवनात सुख नसेल, काम होत नसतील तर तुमच्या जीवनात बाधा आहेत. जर भगवान गणेशजींची कृपा प्राप्त झाली तर सगळे थांबलेले कार्य पूर्ण होतात आणि भगवान गणेश यांच्या कृपेने शुभ आणि लाभची प्राप्ती होते आणि जीवनातील सगळे कष्ट दूर होतात. घराचे मुख्य द्वार हे खूप खास असते, येथूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकतात.

म्हणून जी पण कुणी व्यक्ती घराच्या मुख्य दरवाजावर या वडाच्या झाडाचे मूळ टांगत असतो तेव्हा त्या व्यक्तीवर पितरांची कृपा प्राप्त होते, तसेच कुलदेवीही प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते. पण या वडाचे मूळ तुम्हाला असच काढून लावायचे नाही किंवा तसेच आणायचे नाही. हे आणण्यासाठी व लावण्यासाठी काही नियम आहेत.

कोणत्याही सोमवारी, बुधवारी किंवा गुरुवारी वडाच्या मुळांना काढायचे आहे. त्याआधी त्या झाडाला पाणी अर्पण करून, तांदूळ आणि हळदी अर्पण करून वडाच्या मुळाला निमंत्रण द्यायचे आहे की मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तुम्ही कृपा करून माझे सर्व कष्ट दूर करा. असे निमंत्रण देऊन दुसऱ्या दिवशी आकड्याच्या झाडाचे मूळ काढून घ्या व आपल्या घरी आणून गंगाजल नी धुवून ही मुळे सुकवावीत.

हळदीने रंगवून कोणत्याही लाल कापडात बांधून घराच्या मंदिरात ठेवायचे आहे. त्यासमोर एक दिवा लावून महाकालीचे जप करायचे आहे आणि मगच मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचे आहे. वडाच्या झाडाच्या शेजारी महाकाली चे गण उपस्थित असतात. म्हणजे तुमच्या जीवनात जर शत्रू तुम्हाला जास्त त्रास देत असतील आणि तुम्ही हे मूळ मुख्य द्वारावर लावले तर शत्रू ही तुम्हाला त्रास देणार नाहीत. व तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button