राशिभविष्य

असे असतात मीन राशीचे लोक जाणून घ्या त्यांच्या स्वभावातील काही खास वैशिष्ट्ये..

नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्योतिष्यशास्त्रानुसार मीन राशि विषयी माहिती पाहणार आहोत. मीन राशि ही राशि चक्रातील शेवटची म्हणजे बारावी राशी असून या राशीचा स्वामी गुरु आहे. हे जलतत्त्वाची राशी असून दिशा उत्तर आहे. यांच्यासाठी शुभवार मंगळवार गुरुवार आणि रविवार आहेत. शुभरंग लाल गुलाबी पिवळा आणि केशरी असून शुभांक एक तीन चार आणि नऊ आहे. मीन राशीचे लोक हे फारच दयावान दयाळू आणि भावनिक स्वभावाचे मानले जातात. हे अतिशय संवेदनशील आणि फारच भाऊक मानले जातात. गुरुचा प्रभाव असल्याने फार बुद्धिमान आणि शारीरिक दृष्ट्या स्वस्त असतात. ते स्वतंत्र विचाराचे असून बंदनात राहणे त्यांना पसंत नसते. हे स्वतःच स्वतःचे निर्णय घेतात.

यांची निर्णय क्षमता फार मजबूत असून हे अनेक प्रतिभेचे धनी असतात. कोणतेही काम करताना फार विचारपूर्वक करतात. हे कल्पनाशील असून सामान्य लोकांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि ज्ञानी मानले जातात. पण बऱ्याच वेळा नकारात्मक मानसिकता आणि निराशावादी दृष्टिकोनामुळे विजयाला देखील पराजयामध्ये बदलू शकतात. यांच्याकडे एकाग्रतेची कमी असते.

हे लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांच्या आधारावर जगणे यांना आव डत नाही. जीवनातील जोडीदारांमध्ये पूर्णपणे समर्पित असतात. त्यांचे अंतकरण अतिशय निर्मळ असते. त्यामुळे यांना भाग्याचे भरपूर सात लाभते प्राप्त होते. आणि म्हणून यांची प्रगती आणि उन्नती होत असते. चळकपट करणे यांना आवडत नाही. हे सुंदर मनाचे शुद्ध अंतकरणाचे धन्य असून इमानदार व्यक्तीचे मानले जातात. जीवनात भरपूर प्रगती करू शकतात.

कामांमध्ये सातत्य ठेवणे यांना अवघड जाते. एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतात. किंवा नित्य काही नवे करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्यात विचारांची एक सीमा असते. जेव्हा जेव्हा यांचा निर्णय चुकतो किंवा अपयश त्यांच्या पदरी येते तेव्हा हे फार निराश होतात. हे आध्यात्मिक स्वभावाचे असतात. अध्यात्माची फार आवड असते. पूजा पाठ करण्यावर भर असते. एक आदर्शवादी जीवन जगण्यावर भर देतात किंवा विश्वास करतात. हे क्षमाशील वृत्तीचे असून अतिशय रोमँटिक स्वभावाचे मानले जातात. यांचे नुकसान किंवा अजित करणाऱ्यांना सुद्धा हे फार लवकर क्षमा करतात. दुसऱ्यांच्या गोष्टींचा यांच्यावर फार लवकर प्रभाव पडतो. त्यामुळे अनेक वेळा संकटांना घाबरतात.

पण काही वेळ उलटल्यानंतर स्वतःला सावरून संकटाचा सामना करून त्यातून बाहेर देखील पडतात. कार्यक्षेत्रात अतिशय मन लावून आणि एकाग्रचिताने कामे करतात. नोकरीत अधिकारी वर्ग त्यांच्यावर खुश असतो. हे कधी आशावादी तर कधी निराशावादी पण बनू शकतात. लोकांना समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लावतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रका रची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समा जाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button