तुमचा गण कोणता आहे ? देवगण, मनुष्य गण कि राक्षस गण ? जाणून घ्या…

मित्रानो ज्योतिषशास्त्रात देव गण, मनुष्य गण आणि राक्षस गण या तीन प्रकारात मानवाची विभागणी केली गेली आहे. तीन गणांमध्ये ‘देव’ श्रेष्ठ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार देव गणात जन्मलेल्या व्यक्तीच्या स्वभावात देवां सारखे गुण असतात. या व्यक्ती देवतां सारखेच गुण घेऊन जन्माला येतात.राक्षस गणाचे लोक कोणापेक्षा कमी नाहीत. ते धैर्यवान आणि दृढ इच्छाशक्ती बाळगणारे असतात. त्यांची जगण्याची पद्धत मनमौजी असते. मर्यादेत कसे जगायचे हे त्यांना कळत नाही. मात्र कुंडलीत ग्रहांची स्थिती चांगली असेल तर अशी व्यक्ती समाजात नाव कमावते.सुंदरों दानशीलश्च मतिमान् सरलः सदा । अल्पभोगी महाप्राज्ञो तरो देवगणे भवेत् । या श्लोकात असे म्हटले आहे की, देवगण मध्ये जन्मलेली व्यक्ती दानशूर, बुद्धिमान, साध्या मनाची, कमी खाणारी आणि विचाराने श्रेष्ठ असते.
देवगणमध्ये जन्मलेले लोक सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात. त्यांचे मन अतिशय कुशाग्र असते. हे लोक स्वभावाने साधे आणि सरळ असतात. त्यांना इतरांबद्दल सहानुभूती बाळगणे आणि इतरांना मदत करणे आवडते. या गणातील लोक गरजूंना मदत करण्यास तत्पर असतात. मानी धनी विशालाक्षो लक्ष्य वेधी धनुर्धरः । गौर: पोरजन ग्राही जायते मानवे गणे ।। याचा अर्थ असा कि मानव समूहात जन्मलेला मनुष्य बुद्धिमान, धनवान, मोठे डोळे असलेला, धनुर्विदया जाणणारा, लक्ष्य वेधण्यास सक्षम, गोरा वर्ण असलेला असतो, असे यात म्हटले आहे. असे लोक काही समस्या
किंवा नकारात्मक परिस्थितीत घाबरून जातात. परि स्थितीशी सामना करण्याची क्षमता यांची कमी असते. उन्मादी भीषणाकार: सर्वदा कलहप्रियः । पुरुषो दुस्सहं बूते प्रमे ही राक्षसे गण ।। या श्लोकात दानवांच्या गटात जन्मलेले मूल उन्मादी, स्वभावाने उग्र, भांडखोर, आणि कडवट शब्द बोलणारे असते. पण, असे असूनही राक्षस गणातील लोकांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत.ते त्यांच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्तींना सहज ओळखतात. त्यांच्याकडे भविष्यातील घटनांची पूर्वचित्रे असतात. त्याची सहा इंद्रिय जबरदस्त असतात.
भीतीपोटी ते प्रसंगातून पळून जात नाहीत, तर खंबीरपणे त्यांचा सामना करतात. अश्विनी, मृगाशिरा, पुन्नवसु, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती नक्षत्रात जन्म घेणारे
लोक देव गणाचे लोक आहेत. ज्या लोकांचा जन्म भरणी, रोहिणी, अर्दा, पूर्वा फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी, पूर्वा षडा, उत्तर षडा, पूर्वा भाद्रपदा, उत्तर भाद्रपदात झाला आहे, मनुष्य ‘गणाचे लोक आहेत.आश्लेषा, विशाखा, कृतिका, चित्रा, मघा, ज्येष्ठ, मूल, धनिष्ठा, शतभिषा नक्षत्रांमध्ये जन्मलेल्यांना राक्षस गणाच्या अंतर्गत मानले जाते. लग्ना च्या वेळी ज्योतिषीही गण जुळवतात. गण व्यव स्थित जुळले की वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो. जेव्हा वधू आणि वरात समान गण अस तात, तेव्हा दोघां मध्ये चांगले सामंजस्य राहते, असा विवाह सर्वोत्तम आहे. वधू-वर देवगणाचे असतील तर वैवाहिक जीवन समाधान कारक होते. या स्थितीत विवाह करता येतो. वधू आणि वर देव गण आणि राक्षस गण असेल तर दोघांमध्ये एकवाक्यता नसते. लग्न करू नये.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news