Upaay totke

नारळावर कापूर जाळून हा मंत्र म्हणा, घरातील कटकटी, कार्यातील अडथळे दूर होतील.

मित्रांनो आज आपण स्वामींच्या माहितीकोषातील एक लक्ष्मी प्राप्ती, तसेच कामातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय पाहणार आहोत ब्रह्मांडनायक श्री स्वा मी समर्थ म्हणजे जो व्यक्ती वाट सोडून भटकून जातो तेव्हा त्याला मार्ग दाखवणारा दिवा आहे. कधी एखाद्याची इच्छा साध नाने पूर्ण होते, कोणी प्रयत्न करत राहतात तर कोणी हिंमत सोडून देतात. पण एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर हजार अपयशानंतरही प्रयत्न सोडू नये. एक दिवस यश फक्त एकत्र राहते. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय तुमची इच्छा नक्की च पूर्ण करू शकतो.

श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय विधी च्या अनुषंगाने आपल्या समोर मांडत आहोत. तंत्रशास्त्रा त करपूर होऊन या नावाचा अत्यंत प्रभावशाली विधी सांगितलेला आहे. हा विधी करायला कापराच्या गोळ्या आणि एक नारळ लागेल. हा नारळ आपण सोलायचा आहे आणि या नारळाची शेंडी आपल्या देवघरासमोर पाटावर ठेवायची आहे. या नारळावरती कापराच्या 7 गोळ्या ठेवायच्या आहेत मात्र या गोळ्या ठेवायची एक पद्धत आहे.

सुरुवातीला फक्त एक गोळी ठेवायची आहे आणि ही गोळी प्रज्वलित करायची आहे बरोबर नारळा च्या मध्यावर ठेवायची आहे. गोळी प्रज्वलि त केल्यावर ‘श्री स्वामी समर्थ ‘ या मंत्राचा सारखा जप करायचा. पहिली गोळी संपत आली की त्याजागी दुसरी गोळी ठेव्याची आहे अश्या प्रकारे आपण 7 गोळ्या प्रज्वलित करायच्या आहेत. कापराची ज्योत कायम चालू राहील विजनार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आहे.

मित्रांनो हा विधी नक्की कधी करायचा. आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करणार आहात. देवपूजा संपन्न झाल्यानंतर हा विधी करू शकता. सायंकाळी जेव्हा तुम्ही देवघरात दिवा प्रज्वलित करता तर दिवेलागणीच्या वेळी आपण हा उपाय करायचा आहे. हा छोटासा विधी आपल्या घरात शांतता निर्माण करतो. जर घरामध्ये सातत्याने कटकटी होत असतील, लोक एकमेकांशी प्रे माने वागत नाहीत, तर हा उपाय करून पहा. हा उपाय करून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरात झालेली दिसेल घरामध्ये सुख शांतता निर्माण होईल.

मित्रानो तुमच्या मनात जर नैराश्य असेल तर ह्या उपायाने मनातील नैराश्य दूर होते आपली मन स्थिर होते. एखादी समस्या आहे आणि ती समस्या सुटत नाहीये या समस्येबाबत उत्तर आपल्याला स्वामींच्या कृपेने जरूर मिळत. एखादा निर्णय घ्यायचा आहे मात्र निर्णय नक्की कोणता घ्यावा त्यामध्ये सुद्धा हा करपूर विधी अत्यंत कामी येतो. तुम्ही योग्य त्या निर्णयावर नक्की पोहोचाल. असा हा उपाय तुम्ही दररोज करू शकता आणि प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावसेला हा नारळ बदलायचा आहे.

हा नारळ आपण त्या दिवशी फोडायचा आहे जर तो खराब निघाला तर वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा जर एका पिंपळाच्या, वडाच्या झाडाखाली ठेऊन आलात तरीही चालेल. जर नारळ चांगला निघाला तर तो घरातल्यानी प्रसाद म्हणून खायचा आहे मित्रानो श्री स्वामी समर्थांचा महिमा खूप मोठा आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button